Monday, December 21, 2015

'चपराक'ची दर्जेदार ग्रंथसंपदा

'चपराक प्रकाशन'कडून वैविध्यपूर्ण विषयांवर वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली जातात. आमच्या पुस्तकांना वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याठिकाणी 'चपराक'च्या निवडक पुस्तकांचा परिचय देत आहोत. ही पुस्तके मागवण्यासाठी संपर्क : 'चपराक प्रकाशन', पुणे (०२०)  २४४६०९०९ 


कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट 
राजेंद्र व्होरा आणि सुहास पळशीकर या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दोन ‘विद्वान’ प्राध्यापकांनी महाराष्ट्रातील सत्तांतरावर पुस्तक लिहून, शब्दाशब्दाला चुकीचे संदर्भ देऊन वाचकांची दिशाभूल केली. ‘ग्रंथाली’सारख्या मान्यवर प्रकाशन संस्थेने व्यावसायिक दृष्टिकोनातून या पुस्तकाचा धंदाही उत्तम केला. सुप्रसिद्ध पत्रकार आणि विचारवंत भाऊ तोरसेकर यांनी मुद्देसूदपणे, पुराव्यासह या पुस्तकाची आणि वैचारिक भ्रष्टतेची केलेली परखड चिकित्सा म्हणजे हे पुस्तक.
पाने - 148  किंमत - 150

भाषेचं मूळ
भाषा मूळात अस्तित्वात कशा आल्या? माणसालाच हे वरदान का? मानव जगभर समान असला तरी भाषाभाषात एवढे विभेद का? भाषागट कसे जन्माला येतात? एका भाषेतून सहयोगी भाषेचा जन्म होतो, हे खरे आहे का? भाषागट कितपत संयुक्तिक आहेत? संस्कृतमधून प्राकृत भाषा निर्माण झाल्या की सत्य वेगळेच आहे? हे समजून घेण्यासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांचं हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
पाने - 112 किंमत - 110


दखलपात्र
‘सामान्य माणसाचा उंचावलेला स्वर’ हे ब्रीद घेऊन चतुरस्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष भूमिकेतून ‘चपराक’ची वाटचाल सुरू आहे. रोखठोक आणि परखड विश्‍लेषण केल्याने, सातत्याने ठाम भूमिका घेऊन सत्याचा कैवार घेतल्याने ‘चपराक’चे अग्रलेख वाचकप्रिय ठरले आहेत. साप्ताहिक ‘चपराक’ आणि ‘साहित्य चपराक’ मासिकातील घनश्याम पाटील यांचे निवडक अग्रलेख या संग्रहात वाचायला मिळतील.
पाने - 176, किंमत - 150


गंध माणसांचा
हल्ली जो-तो स्वत:ची दु:ख कुरवाळत बसलाय. स्वार्थाच्या नादापायी आपुलकी, माणुसकी हरवून बसलाय; मात्र अशा काळोखात एखादी पणती मिनमिनत असतेच ना? तिच्या परीने ती अंधार भेदण्याचे कार्य करीतच असते. तिच्या प्रकाशकक्षेत येईल त्याला वाट दाखविण्याचे सामर्थ्य आणि जिद्द तिच्यात असते. अशा प्रेरणादायी व्यक्तींचा परिचय करून देणारे संजय वाघ यांचे हे पुस्तक वाचायलाच हवे.
पाने - 128 किंमत - 130


ओविली फुले मोकळी
सर्वसामान्य माणसाला वाटणार्‍या काळज्यांबद्दल, भीतीबद्दल, त्याला हव्या असणार्‍या किमान स्वास्थ्याबद्दल, तो शोधत असणार्‍या आधाराबद्दल वाचकांशी एकरूप होऊन केलेले चिंतन म्हणजे सुप्रसिद्ध साहित्यिक सदानंद भणगे यांचे या पुस्तकातील लेख. हे लेख वाचताना वाचक जगण्यावर प्रेम करू लागतात.
पाने - 160  किंमत - 150


विज्ञानमूर्ती ज्ञानोबा तुकोबा
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींनी चालवलेली भिंत अथवा जगद्गुरू तुकोबारायांचे वैकुंठगमन असे विषय महाराष्ट्रात कायम चर्चेला जातात. मात्र कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार करण्याची अद्भूत क्षमता असलेल्या मराठी माणसावर अशा गोष्टीचा परिणाम होत नाही. त्यांच्या श्रद्धा अटळ आहेत. ज्ञानोबा आणि तुकोबा यांचे कार्य अद्भूत, विलक्षण, तर्कसंग आणि विज्ञाननिष्ठ असल्याने या पैलूंविषयी लिहिले आहे दत्तात्रय गायकवाड यांनी.
पाने - 164  किंमत - 130

झुळूक आणि झळा
अवताभोवताली घडणार्‍या सामाजिक, राजकीय घटना, सांस्कृतिक-भाषिक शेरेबाजी, राजकीय नेत्यांचं वर्तन, धर्मगुरू, विचारवंतांचे वक्तव्य अशा प्रत्येक गोष्टींवर आजच्या तरूणपिढीचं स्पष्ट-प्रातिनिधिक ‘मत’च घनश्याम पाटलांनी आपल्या अग्रलेखातून मांडलेलं आहे. ‘झुळूक आणि झळा’ या त्यांच्या अग्रलेखसंग्रहातून कुणाचीही भीडभाड न ठेवता त्यांनी व्यक्त केलेली मतं म्हणजे शब्दांचे अक्षरश: ‘फुटाणे’ फोडत अवघ्या तरूणाईच्या मतमतांतराचं घडवलेलं मतप्रदर्शन आहे.
पाने - 140  किंमत - 150

थोडं मनातलं
जीवन जगताना सामान्य माणसाला जे प्रश्‍न पडतात ते शब्दबद्ध करण्याचं काम संवेदनशील मनाचे लेखक विनोद श्रा. पंचभाई यांनी केले आणि या पुस्तकाची निर्मिती झाली. पोटतिडिकेने सत्य मांडणारे, वाचकांना संस्काराची शिदोरी देणारे, संस्काराचा पाया बळकट करणारे या पुस्तकातील लेख वाचकांना अंतर्मुख करतात. प्रासादिक भाषा हे या पुस्तकाचे शक्तीस्थान आहे.
पाने - 120  किंमत - 125



एमरल्ड ग्रीन
मोजक्या शब्दात, नेमकेपणे विलक्षण अनुभव मांडण्याचे सामर्थ्य असणार्‍या समीर नेर्लेकर यांचा हा कथासंग्रह. भौतिक जगासारखंच आपल्या आतही एक जग असतं. या दोन्ही जगांचा समांतर प्रवास कधी अस्वस्थ करणारा तर कधी विलक्षण आनंद देणारा. या प्रवासात बरंच काही घडून जातं, कल्पनेच्याही पलीकडेचं! तेच अनुभव रूजतात, बहरतात, त्यांची फुलं होतात. त्यातूनच ‘एमरल्ड ग्रीन’सारख्या अस्सल कथा जन्माला येतात.
पाने - 72 किंमत - 75


बाळासाहेब एक अंगार

बाळासाहेब ठाकरे! महाराष्ट्राचे राजकारण तळापासून ढवळून काढणारे नाव. 50 वर्षे सतत धगधगत असलेला हा अंगार. माणूस म्हणून ते होते तरी कसे? त्यांचा स्वभाव कसा होता? वागणं कसं होतं? त्यांच्या आयुष्यात कोणकोणत्या घटना घडल्या? या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी नागेश शेवाळकर यांचे हे पुस्तक नक्की वाचा.
पाने - 160  किंमत - 175


लोकनायक महाराजा सयाजीराव गायकवाड
बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र म्हणजे एका समर्थ लोकनेत्याची गौरवगाथाच! महाराजा सयाजीराव यांच्या समाज परिवर्तनवादी भूमिकेचा यथार्थ आढावा या पुस्तकात घेतला गेला आहे. विशेषत: महाराजा सयाजीराव यांच्या दुर्मिळ कौटुंबिक आठवणीही या पुस्तकात आहेत. एका अफाट क्षमतेच्या नायकाचे चरित्र आणि चारित्र्य समजून घेण्यासाठी चंद्रलेखा बेलसरे यांचे हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
पाने - 64  किंमत - 70


एकनाथजी रानडे
भारताच्या दक्षिण टोकाला कन्याकुमारी येथे समुद्रातील श्रीपाद शीलेवर उभे असलेले स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक सार्‍या देशाला माहीत आहे. तीन सागरांच्या संगम स्थळी असलेल्या या स्मारकाला मूर्त रूप दिले ते एकनाथजी रानडे या  मराठमोळ्या लढवय्याने. एकनाथजींच्या जीवन चरित्राची आणि या अफाट कार्याची ओळख युवा पत्रकार सागर सुरवसे यांनी या पुस्तकाद्वारे करून दिली आहे.
पाने - 56  किंमत - 75



शांतीदूत

लालबहाद्दूर शास्त्री हे एक चारित्र्यसंपन्न, त्यागी, देशसेवेला जीवन वाहून घेतलेले, सामान्य कुटुंबात जन्म घेऊन स्वकर्तृत्वाने पंतप्रधान पदापर्यंत गेलेले प्रभावी नेतृत्व. त्यांचे चरित्र म्हणजे जणू सद्वर्तनाची श्‍वेतपत्रिकाच. प्रभाकर तुंगार यांनी लिहिलेले शास्त्रीजींचे हे छोटेखानी चरित्र बाल-किशोरांनी आणि मोठ्यांनीही वाचायलाच हवे.
पाने - 40  किंमत - 50



आपले राष्ट्रसंत

निकोप आणि सदृढ समाज निर्मितीचे अथांग ध्येय उराशी बाळगणारे मानवतावादी संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी. त्यांचे आयुष्य म्हणजे समाजप्रबोधन आणि राष्ट्रभक्तीचे मुर्तीमंत रूप! ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून त्यांनी सोप्या भाषेत समाजप्रबोधन केले. देश विदेशात त्यांच्या कीर्तीचा सुगंध दरवळला. राष्ट्रसंतांविषयी नेमकेपणे, सोप्या शैलीत विनोद श्रा. पंचभाई यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
पाने - 56  किंमत - 60


कवडसे
आजचे तरूण काय वाचतात, काय लिहितात, काय बोलतात, काय खातात, काय घालतात याची निरिक्षण केले तर राष्ट्राच्या प्रगतीची दशा आणि दिशा कोणाच्याही सहगपणे लक्षात येईल. पंढरपूर येथील युवा पत्रकार स्वप्नील कुलकर्णी यांनी राज्यातील  आणि राष्ट्रातील विविध विषयांचा डोळसपणे घेतलेला धांडोळा म्हणजे ‘कवडसे’ हे पुस्तक. या पुस्तकात सामाजिक, वैचारिक विषयावरील लेख आपल्याला वाचावयास मिळतील.
पाने - 112  किंमत 110


तपोभूमी नाशिक

तपोभूमी म्हणजे अशी भूमी की जेथे श्रीरामासह ऋषीमुनी, साधुमहंत, राजेमहाराजे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आले अन् जगाला अलौकिक इतिहास देऊन गेले. येथे विजयांच्या गुढ्या उभारल्या गेल्या. या भूमीने कधी कोणाला पराजित होणे शिकविले नाही. धर्मपीठाचा दर्जा मिळालेल्या अन् दर बारा वर्षांनी येणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यात फुलणार्‍या गोदाकाठच्या नाशिकने आपले माहात्म्य कायम राखत कात टाकले आहे. मंदिरांचे शहर अशीही नाशिकची ओळख आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्याची सर्वांगसुंदर ओळख करून देणारे रमेश पडवळ यांचे पुस्तक म्हणजे ‘तपोभूमी नाशिक’.
पाने - 232  किंमत - 230

हसण्यावर टॅक्स नाही

आपण का हसतोय? माहीत नाही. तरीही हसतोय. कुणीतरी घसरून पडला म्हणून हसतोय, लोकांच्या शारीरिक व्यंगावर हसतोय. बघा, इतर जण हसले म्हणून आपणही हसतोय, पुरषाने बाईचे कपडे घातलेत म्हणून, तर शाब्दिक करामतींमुळे अर्थाचा अनर्थ होतोय म्हणून हसतोय. भोवतालच्या गोंधळात आपलीच केवीलवाणी अवस्था पाहून स्वत:वरही हसतोय. हसण्यासारखं काहीच नाही तरीही हसतोय. हसावं, भरपूर हसावं; असं सर्वांना हसत ठेवणारं समीर नेर्लेकर यांचं हास्य चित्रांचं पुस्तक म्हणजे ‘हसण्यावर टॅक्स नाही’.
पाने - 64  किंमत - 60


चार शिलेदार
समाजातील प्रतिकूल परिस्थितीतही माणसावर झालेले चांगले संस्कार त्याला असत्य, अन्याय, विपरीत गोेष्टींबद्दल लढायला कसे शिकवतात याचे चित्रण ‘चार शिलेदार’ या सुभाष कुदळे यांच्या पुस्तकातून आलेले आहे. समाज बदलला पाहिजे असे सारेजण म्हणतात पण प्रत्यक्षात वेळ येताच कितीजण पुढे येतात? वयाने लहान असूनही समाज बदलावयाची आकांक्षा व त्यासाठी आपल्या परीने कष्ट घेण्याची तयारी असलेल्या चार शिलेदारांची ही प्रेरक कथा.
पाने - 64  किंमत - 60


मुलांच्या मनातलं
लहान मुले आणि किशोरवयीन बालके यांची मनोअवस्था बर्‍याचवेळा पालकांनाही कळत नाही. उद्याच्या राष्ट्राचे उज्ज्वल आणि संपन्न भवितव्य असणार्‍या या पिढीला संस्कारशील साहित्य उपलब्ध करूण देणे ही फार मोठी गौरवाची बाब आहे. विनोद श्रा. पंचभाई यांनी त्या दृष्टिने टाकलेले पाऊल म्हणूनच अभिनंदनीय ठरते. ‘मुलांच्या मनातलं’ या पुस्तकातील छोट्या कथांद्वारे त्यांनी किशोरांचे आणि पालकांचे रंजनातून प्रबोधन केले आहे.
पाने - 56  किंमत - 75

No comments:

Post a Comment