गुलजार हा एक उत्तम दिग्दर्शक आहे यात काहीच वाद नाही, परंतु तो तितकाच उत्तम गीतकार आणि कवी आहे का? या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे देण्याआधी थोडा विचार करावा लागेल. बहुदा तो कवी आहे की नाही, हाच मुळात वादाचा मुद्दा आहे. या जगात अशी माणसे आहेत, ज्यांना फक्त किनार्यावर बसूनच उसळत्या लाटा नुसत्या पाहण्यातच धन्यता वाटते. त्या लाटांमध्ये स्वत:ला पूर्णत: झोकून देऊन, त्यापलीकडे जाऊन खोलवर असलेल्या आशयाचा तळ गाठण्याची त्यांना अजिबात गरज वाटत नाही. मग अशा लोकांच्या नजरेसमोर उसळत्या लाटांच्या दृश्यतेचा केवळ एक आभास निर्माण केला तरी पुरेसा असतो. मग नजरेसमोर आशयाचा तळ आणि लाटा प्रत्यक्षात असो किंवा नसो, त्यांचा आभास मात्र असतो, अगदी खर्यासारखीच अनुभूती देणारा! हा आभास निर्माण करणारे अनेक जादूगार या जगात आहेत. अशाच एका जादूगाराचं नाव आहे, गुलजार!
इंग्रजी भाषेत ‘मॅनिपुलेटर’ असा शब्द आहे. या शब्दाचे तंतोतंत भाषांतर मराठीत अथवा अन्य भाषेत करता येणे कठीण आहे. ‘आपले कौशल्य वापरून इतरांना भुलवणारा इसम’ असा काहीसा या शब्दाचा अर्थ आहे. गुलजारला जर कवी म्हणायचे असेल, तर नुसता ‘कवी’ हा शब्द न वापरता, त्याला ‘मॅनिपुलेटर पोएट’ असे म्हणावे लागेल. गुलजारच्या कवितेला ‘अस्सल’ मानून तिचा आंधळेपणाने आस्वाद घेणारे लाखो चाहते आहेत, परंतु माझ्या दृष्टिने गुलजारची कविता म्हणजे केवळ भावनांची लबाडी अन् शब्दांची हातचलाखी, यापेक्षा वेगळं काहीही नाही!
गुलजारला मी गुलजार असं म्हणतोय, इतरजण म्हणतात त्याप्रमाणे ‘गुलजार साहेब’ किंवा ‘गुलजार साब’ असं न म्हणता त्याचा एकेरी उल्लेख करतोय. माझ्या या उद्धटपणाचा गुलजारच्या अनेक चाहत्यांना राग येणं स्वाभाविक आहे. शिवाय गुलजारच्या प्रतिभेबद्दल अशी बेधडक विधानं करण्याचा मला काय अधिकार? अधिकार आहे! माझ्या मते, औपचारिकता ही परक्यांच्या बाबतीत पाळली जाते. जिथे दोन गोष्टींमध्ये ‘अंतर’ हा घटक असतो, तिथे औपचारिकता अस्तित्वात असते. प्रेम हे औपचारिकतेचे खोडरबर आहे. आपण ज्या गोष्टीवर अगदी मनापासून प्रेम करतो, तिथे औपचारिकता गळून पडते. माझ्या अगदी लहानपणी, जेव्हापासून मला थोडेफार कळू लागले, तेव्हापासून माझ्या भोवतालच्या वातावरणाने मला ही ‘गुलजार’ नावाची लस माझ्याही नकळत टोचली आणि तेव्हापासून हे रसायन माझ्या धमन्यांमधून वाहतं आहे. माझ्या भोवतालची माणसं (त्यात माझ्या वडिलांचाही समावेश आहे) गुलजारबद्दल अगदी भरभरून बोलायची, त्याच्या हातून घडलेल्या प्रत्येक निर्मितीचे माझ्यादेखत कौतुक व्हायचे, त्यामुळे हा गुलजार कोण आणि त्यानं काय काय उपद्व्याप करून ठेवलेत, याचा परिचय मला अगदी लहानपणीच घडला होता. माझ्या चिमुकल्या डोळ्यांपुढे त्यावेळी गुलजार हाच एक ग्लॅमरचा चेहरा होता. तसं कळत तर काहीच नव्हतं, पण मोठेपणी कोण बनायचं? तर ‘गुलजार’ बनायचं, असा एक सूर अंतरात कुठेतरी उमटला होता. मी शाळेत असताना पुण्यातील एका दैनिकाने खुली चित्रकला स्पर्धा आयोजीत केली होती. त्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून गुलजार आला होता. त्यावेळी प्रथमच त्याला अगदी जवळून पाहण्याचा योग आला. पांढरा आखूड कुर्ता, पायजमा, पायात साधी चप्पल, गालावर अर्धवट वाढलेली दाढी आणि डोळ्यांवर जाड काळ्या फ्रेमचा चश्मा. गुलजारच्या हातून प्रशस्तीपत्र स्वीकारताना त्यानं माझ्या पाठीवर हात ठेवला होता आणि मग त्यानंतर गुलजारचा साधेपणा हीच माझी ग्लॅमरची व्याख्या बनली. गुलजार हा माझा खरा हिरो! त्याच्या प्रतिभेच्या लाखो चाहत्यांपैकी मीदेखील एक. त्यानेच निर्माण केलेल्या एका विलक्षण जादूई दुनियेचा मीही एक प्रवासी. ‘पत्थर की हवेली को, शीशे के घरोंदे मे, तिनकों के नशेमन तक, इस मोड से जाते है...’, असं म्हणत त्यानं जो अंधुक मार्ग दाखवला, त्या मार्गानं माझा भावनिक प्रवास सुरू झाला, ‘मुसाफिर हूं यारों, ना घर है, ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना’, असं म्हणत!
हा प्रवास आनंददायक होता, यात काहीच शंका नाही, परंतु तिथेच एक गल्लत झाली. मी लहानपणी जेव्हा प्रथमच नाटकाचा रंगमंच बघितला होता, तेव्हा मला घराच्या भिंती, दारं, खिडक्या हे सगळं अगदी खरं वाटलं होतं, तेव्हा मला घराच्या भिंती, दारं, खिडक्या हे सगळं अगदी खरं वाटलं होतं, ते दृश्य पाहून मी भूलून गेलो होतो, पण जेव्हा माझ्या वडिलांनी मला विंगेत नेलं तेव्हा मात्र माझा भ्रमनिरास झाला. त्या घराच्या भिंती कापडाच्या होत्या आणि दारं-खिडक्याही खोटी होती. मी त्यांना स्पर्श करून माझी खात्रीही करून घेतली. असाच काहीसा प्रकार गुलजारच्या कवितेबाबत झाला. ज्या उसळत्या लाटांमध्ये चिंब भिजण्याच्या हेतूने मी झेपावलो, त्या ठिकाणी लाटाही नव्हत्या आणि आशयाचा तळही नव्हता. होता फक्त आभास!
संपूर्ण सिंग कालरा (अर्थात गुलजार) या जन्म 18 ऑगस्ट 1934 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाबच्या झेलम जिल्ह्यातील दीना या गावात कालरा आरोरा शीख कुटुंबात झाला. त्याचे वडील माखन सिंग कारला आणि आई सुजन कौर यांना फाळणीनंतर भारतात स्थलांतरीत व्हावे लागले. गुलजार लहान असताना सवंगड्यांमध्ये शेरो-शायरीच्या भेंड्या खेळायचा. त्यावेळी एखाद्या शेरच्या ओळी आठवल्या नाहीत तर तो लबाडी करून स्वत:च्याच मनाच्या ओळी घूसडून शेर पूर्ण करायचा. आपली हीच सवय पुढे जाऊन आपला रोजी-रोटीचे साधन बनणार आहे, याची कदाचित त्यावेळी त्याला कल्पना नसावी. मुंबईत आल्यावर संपूर्ण सिंग एका गॅरेजमध्ये काम करू लागला. अपघातग्रस्त मोटारगाड्यांना टच अप करण्याचे काम तो करायचा. गॅरेजमध्ये काम करत असताना मुंबईतल्या टिपीकल ‘बम्बईय्या’ हिंदी भाषेशी त्याचा परिचय झाला. ‘गोली मार भेजे में, भेजा शोर करता है’, हे गीत तिथल्याच भाषिक संस्काराचे फलित असावे. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे संपूर्ण सिंगने गीतलेखन करण्याचे ठरविले. त्या काळात अनेक दिग्गज उर्दू शायर टोपण नावाने गीतलेखन करत होते. ‘अब्दुल हायी’ हे मूळ नाव असणारे शायर पंजाबच्या लुधियाना शहरातून आले असल्याने त्यांनी ‘साहिर लुधियानवी’ असे नाव घेतले होते. त्याच पद्धतीने संपूर्ण सिंगने आपले नाव ‘गुलजार दीनवी’ असे ठेवले. दीना या गावचा म्हणून दीनवी. पुढे मग त्यातले दीनवी गळून पडले आणि उरले फक्त ‘गुलजार’.
1963 साली गुलजारने प्रथम बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’ चित्रपटासाठी ‘मोरा गोरा अंग लाई ले...’ हे गीत लिहिले. शैलेंद्र यांनी उर्वरीत गाणी लिहिली. त्यांचे गुलजारला मार्गदर्शन होतेच. शिवाय सचिन देव बर्मन हे गाण्याच्या मीटरबाबत अतिशय कडक शिस्तिचे संगीतकार. त्यांनी त्या गीताचे सोने केले! एकदा का ‘कवी’ असा शिक्का स्वत:वर मारून घेतला की मग सुरू होते शब्दांची अफरातफर! गुलजारने अशी अफरातफर पुष्कळ केली आहे. मिर्झा गालिब यांच्या अतिशय गाजलेल्या ‘दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन’ या गझलेची मोडतोड करून गुलजारने स्वत:च्या नावावर एक गीत तयार केले. ‘मौसम’ या चित्रपटासाठी मदनमोहन यांनी याच गाण्याला दोन चाली दिल्या. भुपेंद्र यांच्या दमदार आवाजातील हे गाणे फार लोकप्रिय ठरले. त्याचप्रमाणे अमिर खुसरो यांच्या ‘ए शरबते आशिकी’ या गझलेवरून गुलजारने ‘ए हैरते आशिकी’ हे गाणे लिहिले. माणिकरत्नमच्या ‘गुरू’ या 2001 साली आलेल्या चित्रपटासाठी ए. आर. रहेमान याने हे गीत संगीतबद्ध केले. आणखी एक उदाहरण द्यायचे झाले तर अगदी अलिकडेच शाहरूख खानच्या ‘दिल से’ या चित्रपटाला ‘छैय्या छैय्या’ या गाण्यासाठी गुलजारची फारच तारीफ झाली. परंतु अनेकांना हे माहीत नसावे की हे गीत बुल्लेह शाह यांच्या ‘थैय्या थैय्या’ या सुफी लोकगीतावरून उचलले आहे. गुलजारचा हा ‘आदर्श’ डोळ्यापुढे ठेवून अनेक ‘जुगाड कवी’ गल्लोगल्ली उगवलेले सध्या पहायला मिळतात. गुलजारची लोकप्रियता वाढू लागली तसे अभिव्यक्तीच्या नावाखाली त्याने भ्रामक संकल्पनांचे तारे तोडायला सुरूवात केली. ‘एक दिन सपने में देखा सपना’ हे ठीक आहे. स्वप्नात स्वप्न दिसणं ही संकल्पना छान आहे, परंतु ‘सपने में देखी सपनी’ ह्या ओळीतला ‘सपनी’ हा शब्द म्हणजे पुढल्या ओळीतील ‘वो जो है ना लता अपनी’ या ओळीशी यमक जुळविण्याचा एक केविलवाणा प्रकार आहे. हे सगळं बघितलं की ‘सब गोलमाल है’ ही ओळ खुद्द गुलजारच्या कवितेलाच लागू पडते, हे स्पष्ट होतं. मुलांसाठी खास असं जे काही लेखन गुलजारने केलं आहे, ते देखील अचाटच आहे. ‘चड्डी पहन के फुल खिला है’, ‘टप टप टोपी टोपी’, ‘ओ पापडवाले पंगा ना ले’ वगैरे केवळ चमत्कृतीपूर्ण शब्दांचे खेळच! गुलजारचे अत्यंत रद्दड गीत म्हणजे 1999 साली आलेल्या ‘हू तू तू’ चित्रपटातील लता मंगेशकर आणि हरिहरन यांनी गायिलेले...
‘इतना लंबा कश लो यारो, दम निकल जाए
जिंदगी सुलगाओ यारो, गम निकल जाए’
धूम्रपानाचे समर्थन करणारे हे गीत गुलजारला ‘ग्रेट कवी’ मानणार्यांनी एकदा अवश्य ऐकावे (...आणि पहावे सुद्धा!) याच सिनेमातलं आणखी एक गाणं आहे, त्याबद्दल मी जास्त न बोललेलंच बरं.
‘छई चप्पा छई, छप्पाक छई
पानींयो पे छिंटे उडाती हुई लडकी...’
‘पानी’ या शब्दाचे अनेकवचन ‘पानीयों पे’ असं फक्त गुलजारंच करू शकतो. हा भाषा भ्रष्ट करण्याचा प्रकार नाही का?
कैफी आझमी आणि मजरूह सुलतानपुरी यांनी तर गुलजारच्या कवितेवर सडकून टीका केली होती. कैफी आझमींनी एका मुलाखतीत सांगितले होते, ‘‘मी गुलजारला कवी मानतच नाही. त्याने कवितेचा खेळ मांडून तिला बदनाम केलं आहे. रोमँटिक पोएट्रीच्या नावाखाली तो वाट्टेल ते खपवतो आहे. त्याला त्याच्या पात्रतेपेक्षा जरा जास्तच प्रसिद्धी मिळत आहे. गुलजार इज फेक पोएट!’’ कैफींचं हे वाक्य फार बोलकं आहे... ‘‘गुलजार इज ए फेक पोएट!’’ 1969 साली ‘खामोशी’ या चित्रपटा गुलजारने एक गीत लिहिलं...
‘हम ने देखी है उन आंखो की मटकती खूशबू
हात से छू कर इसे रिश्तो का इल्जाम ना दो’
मजरूह सुलतानपुरी यांनी या गाण्यावर आक्षेप घेतला. सुगंध हा कधी दृश्यमान असू शकतो का?
गुलजारचं आणखी एक गाणं आहे... ‘नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा’ या गाण्यात ‘नाम गुम जाएगा’ याऐवजी ‘नाम गुम हो जाएगा’ अशी ओळ अपेक्षित आहे, असं मजरूह यांचं म्हणणं होतं. त्यावर गुलजारच्या समर्थकांचं म्हणणं असं की सिनेमाचं गाणं संगीताच्या मीटरमध्ये बसवताना गीतकाराला काही तडजोड आहे. परंतु अशी तडजोड त्यापूर्वी कधी कैफी आझमी, मजरूह सुलतानपुरी, शैलेंद्र, साहिर लुधियानवी, भरत व्यास, जा निसार अख्तर यांच्यासारख्या अनुभवसिद्ध गीतकारांना करावी लागली नव्हती. काव्यरचनेचे सर्व नियम पाळूनही जे काही सांगायचंय ते अगदी प्रभावीपणे सांगता येतं, हे मजरूह सुलतानपुरींचं म्हणणं होतं. तडजोडच करायची होती तर ’नाम खो जाएगा...’ असं लिहिणं अपेक्षित होतं. तडजोड करण्याच्या नावाखाली भाषेचे आणि व्याकरणाचे लचके कशाला तोडायचे? ‘गुड्डी’ या सिनेमासाठी गुलजारने ‘हम को मन की शक्ती देना’ ही प्रार्थना लिहिली. ही प्रार्थना इतकी लोकप्रिय ठरली की ती अनेक शाळांमधून गायिली जाऊ लागली. ह्याच प्रार्थनेतील ‘दुसरों की जय से पहले खुद को जय करें’ या ओळीतील व्याकरण दोषावर अनेक भाषातज्ज्ञांनी वार केले.
वरकरणी साधेपणाचा आव आणणारा हा माणूस शब्दांचा पक्का व्यापारी आहे. साहित्यसेवा म्हणून नव्हे; तर केवळ भरमसाट पैसे उकळण्यासाठी तो गीतसदृश रचना करत असतो. प्रत्येक गीताच्या मानधनाचे आकडे काही लाखात असतात. 2001 साली राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित, अमिताभ बच्चन आणि मनोज वाजपेयी यांच्या भूमिका असणार्या चित्रपटासाठी ‘अक्स’ हे एकाक्षरी शीर्षक सुचविण्यासाठी गुलजारने लाखभर रूपये घेतले होते.
गुलजारमधल्या लेखक आणि कवीला मी कितीही नावं ठेवत असलो तरी त्याच्यातल्या दिग्दर्शकाला मात्र मी अगदी मनापासून सलाम करतो. त्याचे दिग्दर्शन कौशल्य सिद्ध करण्यासाठी फक्त दोनच उदाहरणे पुरेशी आहेत. 1958 सालच्या के. एम. नानावटी विरूद्ध महाराष्ट्र शासन या खून खटल्यावर आधारित ‘अचानक’ हा सिनेमा त्याने दिग्दर्शित केला. विनोद खन्नाची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात त्याने फ्लॅशबॅकच्या आत फ्लॅशबॅक हे जे तंत्र वापरलं आहे, ते जगातील फारंच थोड्या दिग्दर्शकांनी हाताळलं आहे. दुसरे उदाहरण देता येईल ते 1988 साली गुलजारने दूरदर्शनसाठी तयार केलेल्या ‘मिर्झा गालिब’ या मालिकेचे. त्यात नसिरूद्दीन शाहने भूमिका केली होती. बाकी गुलजारचे बरेचसे काम म्हणजे निव्वळ उचलेगिरी आणि जुगाड आहे. त्यानं जे काही उचललं ते चांगलंच उचललं, एवढीच काय ती त्याची गुणवत्ता!
गुलजारने 1971 साली पहिला सिनेमा दिग्दर्शित केला ‘मेरे अपने’. हा सिनेमा 1969 साली प्रदर्शित झालेल्या ‘अपनजन’ या तपन सिन्हा यांच्या बंगाली सिनेमावरून उचललेला आहे. ‘परिचय’ हा सिनेमादेखील राजकुमार मैत्रा यांच्या ‘रंगीन उत्तरैन’ या बंगाली कादंबरीवर आधारित असून ‘साऊंड ऑफ म्युझिक’ या इंग्रजी सिनेमाचा त्यावर प्रभाव आहे. ‘मौसम’ या सिनेमासाठी गुलजारला उत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला, परंतु त्याने या सिनेमाची जी कथा लिहिली, ती मूळ इंग्रजी लेखक ए. जे. क्रेनीन यांच्या ‘द जुडास ट्री’ या पुस्तकातील ‘वेदर’ या कथेवरून उचलेली आहे, हे त्याच्या अनेक चाहत्यांना माहिती नसावे. 1982 साली गुलजारने शेक्सपिअरच्या ‘द कॉमेडी ऑफ एरर’ या रचनेवर आधारित ‘अंगूर’ हा सिनेमा काढला.
भारतीय सिनेमासृष्टीतील अनेक दिग्गज प्रतिभावंत पुरस्काराच्या बाबतीत तसे अपेक्षितच राहिले, पण कैफी आझमी यांच्या म्हणण्याप्रमाणे गुलजारला मात्र त्याच्या प्रतिभेच्या तुलनेत जरा जास्तच पुरस्कार मिळाले. 2002 साली गुलजारला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 2004 मध्ये पद्मभूषण. याशिवाय अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 20 फिल्मफेअर पुरस्कार. 2010 मध्ये त्याला स्लमडॉग मिलेनियर या सिनेमासाठी गीतलेखनाचा ऑस्कर पुरस्कार आणि ग्रॅमी पुरस्कारही मिळाला. ग्या गाण्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे (जय हो), ते गीत जागतिक पातळीवर भारतीय साहित्याचे प्रतिनिधित्व करण्याच्या योग्यतेचे आहे का, याबाबत भारतीयांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. 2012 साली गुलजारला इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार मिळाला आणि सिनेमातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला. गुलजारच्या यशात सर्वात मोठा वाटा आहे, तो त्याच्या संगीतकारांचा. त्यातले सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे राहूल देव बर्मन. अत्यंत प्रयोगशील अशा या संगीतकाराने गुलजारच्या वेड्या-वाकड्या पद्यरचनांनाही गीत बनवले. कोणतेही मीटर नाही, यमक नाही, वृत्त नाही अशा रचनांना उत्कृष्ट चाली लावण्याचे आव्हान आरडीने अगदी लीलया पेलले आहे. अशीच एखादी रचना जर आरडीचे वडील सचिनदा यांना दिली असती तर त्यांनी गुलजारला दारातही उभे केले नसते! ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है...’ अशा वाक्यांना चाली लावणे म्हणजे दिव्यच!
गुलजार लोकप्रिय होण्याचे नेमके कारण काय असावे? आपल्याकडे असा एक स्वयंघोषित बुद्धिजीवी वर्ग आहे, जो साहित्यातले काही कळत नसतानाही केवळ जाणतेपणाचा आव आणून स्वत:चा स्टेटस सिंबॉल म्हणून गुलजारसारख्या माणसाला डोक्यावर घेतो. ह्या वर्गासाठी ‘गुलजार’ हा केवळ त्यांच्या आवडीचा ब्रँड असतो, जो त्यांना समाजात उजळ माथ्याने मिरवता येतो. याच जोरावर गुलजार थोडे-थोडके नव्हेे तर तब्बल 50 वर्षे सतत चर्चेत राहण्यात यशस्वी ठरतो. सोलापूरच्या शशिकांत लावणीस यांचा एक कार्यक्रम होता, ‘गुलजार बोलतो, त्याची कविता होते’ हे त्या कार्यक्रमाचे शीर्षक. गुलजारच्या साध्या बोलण्यातही कविता शोधणार्या या विशिष्ट वर्गाला मग पुलंच्या फुटकळ लिखाणातही साहित्यमूल्य सापडते आणि मग त्यामुळे शंकर पाटील यांच्यासारखा प्रतिभावंत साहित्यिक कायम उपेक्षितच राहतो. जो समाज केवळ किनार्यावर बसून लाटांचा आस्वाद घेत राहतो, त्या समाजात कायम गुलजारसारख्या ‘फेक पोएट्स’चा उदो-उदो होत राहणार आणि प्रतिभेची लबाडी अशीच चालू राहणार. जिथे आस्वाद घणारेच दांभिक असतील तिथे अस्सल स्वादाला किंमत कशी मिळणार?
गुलजारवर माझा व्यक्तिगत आरोप असा आहे की त्याने माझी स्वत:ची फार मोठी फसवणूक केली आहे. होय, फसवणूकच! भावनांची लबाडी आणि शब्दांची हातचलाखी करून त्याने जे विश्व माझ्यासमोर उभे केले, ते मी खरे मानून बसलो होतो, जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही.
इन रेशमी राहों में, एक राह तो वो होगी
तुम तक जा पहुंचती है, इस मोड से जाती है...
...या ओळींमधली ‘राह’ अस्तित्वात नसतानाही मी दिशाहीन वाटचाल करत होतो.
एक राह रूक गयी तो और जुड गयी
मैं मुडा तो साथ साथ राह मुड गयी...
हा भौतिकतेला न पटणारा एक धादांत खोटा सिद्धांत त्यानं माझ्या बालमनावर बिंबवला. वास्तविक जीवनात मात्र कोणतीही वाट माझ्या मर्जीप्रमाणं वळल्याचा मला अनुभव आला नाही.
हमने देखी है उन आंखो की महकती खूशबू...
असं म्हणणार्या गुलजारला अभिप्रेत असलेली ‘खुशबू’ मला मात्र कोणत्याही डोळ्यात ‘दिसली’ नाही. अशा प्रकारे गुलजार नेहमीच जे काही बोलतो ते ‘खोटं’ बोलतो आणि जगासाठी मात्र त्याची ‘कविता’ होते. गुलजार खूप मोठा माणूस आहे. त्याची आणि माझी भेट कधी घडणे शक्य नाही. तरीसुद्धा चुकून-माकून कधी तो समोर आलाच, तर सर्वात आधी मी त्याच्याकडून नुकसान भरपाई वसूल करणार आहे...
...गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या संमतीशिवाय, माझ्या मनात आपल्या फसव्या कवितेसह वास्तव्य केल्याबद्दल!
(साहित्य चपराक, डिसेंबर २०१५)
संपूर्ण अंक आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळावर वाचू शकाल।
- समीर नेर्लेकर, पुणे
९४२२५०८४७१
इंग्रजी भाषेत ‘मॅनिपुलेटर’ असा शब्द आहे. या शब्दाचे तंतोतंत भाषांतर मराठीत अथवा अन्य भाषेत करता येणे कठीण आहे. ‘आपले कौशल्य वापरून इतरांना भुलवणारा इसम’ असा काहीसा या शब्दाचा अर्थ आहे. गुलजारला जर कवी म्हणायचे असेल, तर नुसता ‘कवी’ हा शब्द न वापरता, त्याला ‘मॅनिपुलेटर पोएट’ असे म्हणावे लागेल. गुलजारच्या कवितेला ‘अस्सल’ मानून तिचा आंधळेपणाने आस्वाद घेणारे लाखो चाहते आहेत, परंतु माझ्या दृष्टिने गुलजारची कविता म्हणजे केवळ भावनांची लबाडी अन् शब्दांची हातचलाखी, यापेक्षा वेगळं काहीही नाही!
गुलजारला मी गुलजार असं म्हणतोय, इतरजण म्हणतात त्याप्रमाणे ‘गुलजार साहेब’ किंवा ‘गुलजार साब’ असं न म्हणता त्याचा एकेरी उल्लेख करतोय. माझ्या या उद्धटपणाचा गुलजारच्या अनेक चाहत्यांना राग येणं स्वाभाविक आहे. शिवाय गुलजारच्या प्रतिभेबद्दल अशी बेधडक विधानं करण्याचा मला काय अधिकार? अधिकार आहे! माझ्या मते, औपचारिकता ही परक्यांच्या बाबतीत पाळली जाते. जिथे दोन गोष्टींमध्ये ‘अंतर’ हा घटक असतो, तिथे औपचारिकता अस्तित्वात असते. प्रेम हे औपचारिकतेचे खोडरबर आहे. आपण ज्या गोष्टीवर अगदी मनापासून प्रेम करतो, तिथे औपचारिकता गळून पडते. माझ्या अगदी लहानपणी, जेव्हापासून मला थोडेफार कळू लागले, तेव्हापासून माझ्या भोवतालच्या वातावरणाने मला ही ‘गुलजार’ नावाची लस माझ्याही नकळत टोचली आणि तेव्हापासून हे रसायन माझ्या धमन्यांमधून वाहतं आहे. माझ्या भोवतालची माणसं (त्यात माझ्या वडिलांचाही समावेश आहे) गुलजारबद्दल अगदी भरभरून बोलायची, त्याच्या हातून घडलेल्या प्रत्येक निर्मितीचे माझ्यादेखत कौतुक व्हायचे, त्यामुळे हा गुलजार कोण आणि त्यानं काय काय उपद्व्याप करून ठेवलेत, याचा परिचय मला अगदी लहानपणीच घडला होता. माझ्या चिमुकल्या डोळ्यांपुढे त्यावेळी गुलजार हाच एक ग्लॅमरचा चेहरा होता. तसं कळत तर काहीच नव्हतं, पण मोठेपणी कोण बनायचं? तर ‘गुलजार’ बनायचं, असा एक सूर अंतरात कुठेतरी उमटला होता. मी शाळेत असताना पुण्यातील एका दैनिकाने खुली चित्रकला स्पर्धा आयोजीत केली होती. त्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून गुलजार आला होता. त्यावेळी प्रथमच त्याला अगदी जवळून पाहण्याचा योग आला. पांढरा आखूड कुर्ता, पायजमा, पायात साधी चप्पल, गालावर अर्धवट वाढलेली दाढी आणि डोळ्यांवर जाड काळ्या फ्रेमचा चश्मा. गुलजारच्या हातून प्रशस्तीपत्र स्वीकारताना त्यानं माझ्या पाठीवर हात ठेवला होता आणि मग त्यानंतर गुलजारचा साधेपणा हीच माझी ग्लॅमरची व्याख्या बनली. गुलजार हा माझा खरा हिरो! त्याच्या प्रतिभेच्या लाखो चाहत्यांपैकी मीदेखील एक. त्यानेच निर्माण केलेल्या एका विलक्षण जादूई दुनियेचा मीही एक प्रवासी. ‘पत्थर की हवेली को, शीशे के घरोंदे मे, तिनकों के नशेमन तक, इस मोड से जाते है...’, असं म्हणत त्यानं जो अंधुक मार्ग दाखवला, त्या मार्गानं माझा भावनिक प्रवास सुरू झाला, ‘मुसाफिर हूं यारों, ना घर है, ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना’, असं म्हणत!
हा प्रवास आनंददायक होता, यात काहीच शंका नाही, परंतु तिथेच एक गल्लत झाली. मी लहानपणी जेव्हा प्रथमच नाटकाचा रंगमंच बघितला होता, तेव्हा मला घराच्या भिंती, दारं, खिडक्या हे सगळं अगदी खरं वाटलं होतं, तेव्हा मला घराच्या भिंती, दारं, खिडक्या हे सगळं अगदी खरं वाटलं होतं, ते दृश्य पाहून मी भूलून गेलो होतो, पण जेव्हा माझ्या वडिलांनी मला विंगेत नेलं तेव्हा मात्र माझा भ्रमनिरास झाला. त्या घराच्या भिंती कापडाच्या होत्या आणि दारं-खिडक्याही खोटी होती. मी त्यांना स्पर्श करून माझी खात्रीही करून घेतली. असाच काहीसा प्रकार गुलजारच्या कवितेबाबत झाला. ज्या उसळत्या लाटांमध्ये चिंब भिजण्याच्या हेतूने मी झेपावलो, त्या ठिकाणी लाटाही नव्हत्या आणि आशयाचा तळही नव्हता. होता फक्त आभास!
संपूर्ण सिंग कालरा (अर्थात गुलजार) या जन्म 18 ऑगस्ट 1934 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाबच्या झेलम जिल्ह्यातील दीना या गावात कालरा आरोरा शीख कुटुंबात झाला. त्याचे वडील माखन सिंग कारला आणि आई सुजन कौर यांना फाळणीनंतर भारतात स्थलांतरीत व्हावे लागले. गुलजार लहान असताना सवंगड्यांमध्ये शेरो-शायरीच्या भेंड्या खेळायचा. त्यावेळी एखाद्या शेरच्या ओळी आठवल्या नाहीत तर तो लबाडी करून स्वत:च्याच मनाच्या ओळी घूसडून शेर पूर्ण करायचा. आपली हीच सवय पुढे जाऊन आपला रोजी-रोटीचे साधन बनणार आहे, याची कदाचित त्यावेळी त्याला कल्पना नसावी. मुंबईत आल्यावर संपूर्ण सिंग एका गॅरेजमध्ये काम करू लागला. अपघातग्रस्त मोटारगाड्यांना टच अप करण्याचे काम तो करायचा. गॅरेजमध्ये काम करत असताना मुंबईतल्या टिपीकल ‘बम्बईय्या’ हिंदी भाषेशी त्याचा परिचय झाला. ‘गोली मार भेजे में, भेजा शोर करता है’, हे गीत तिथल्याच भाषिक संस्काराचे फलित असावे. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे संपूर्ण सिंगने गीतलेखन करण्याचे ठरविले. त्या काळात अनेक दिग्गज उर्दू शायर टोपण नावाने गीतलेखन करत होते. ‘अब्दुल हायी’ हे मूळ नाव असणारे शायर पंजाबच्या लुधियाना शहरातून आले असल्याने त्यांनी ‘साहिर लुधियानवी’ असे नाव घेतले होते. त्याच पद्धतीने संपूर्ण सिंगने आपले नाव ‘गुलजार दीनवी’ असे ठेवले. दीना या गावचा म्हणून दीनवी. पुढे मग त्यातले दीनवी गळून पडले आणि उरले फक्त ‘गुलजार’.
1963 साली गुलजारने प्रथम बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’ चित्रपटासाठी ‘मोरा गोरा अंग लाई ले...’ हे गीत लिहिले. शैलेंद्र यांनी उर्वरीत गाणी लिहिली. त्यांचे गुलजारला मार्गदर्शन होतेच. शिवाय सचिन देव बर्मन हे गाण्याच्या मीटरबाबत अतिशय कडक शिस्तिचे संगीतकार. त्यांनी त्या गीताचे सोने केले! एकदा का ‘कवी’ असा शिक्का स्वत:वर मारून घेतला की मग सुरू होते शब्दांची अफरातफर! गुलजारने अशी अफरातफर पुष्कळ केली आहे. मिर्झा गालिब यांच्या अतिशय गाजलेल्या ‘दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन’ या गझलेची मोडतोड करून गुलजारने स्वत:च्या नावावर एक गीत तयार केले. ‘मौसम’ या चित्रपटासाठी मदनमोहन यांनी याच गाण्याला दोन चाली दिल्या. भुपेंद्र यांच्या दमदार आवाजातील हे गाणे फार लोकप्रिय ठरले. त्याचप्रमाणे अमिर खुसरो यांच्या ‘ए शरबते आशिकी’ या गझलेवरून गुलजारने ‘ए हैरते आशिकी’ हे गाणे लिहिले. माणिकरत्नमच्या ‘गुरू’ या 2001 साली आलेल्या चित्रपटासाठी ए. आर. रहेमान याने हे गीत संगीतबद्ध केले. आणखी एक उदाहरण द्यायचे झाले तर अगदी अलिकडेच शाहरूख खानच्या ‘दिल से’ या चित्रपटाला ‘छैय्या छैय्या’ या गाण्यासाठी गुलजारची फारच तारीफ झाली. परंतु अनेकांना हे माहीत नसावे की हे गीत बुल्लेह शाह यांच्या ‘थैय्या थैय्या’ या सुफी लोकगीतावरून उचलले आहे. गुलजारचा हा ‘आदर्श’ डोळ्यापुढे ठेवून अनेक ‘जुगाड कवी’ गल्लोगल्ली उगवलेले सध्या पहायला मिळतात. गुलजारची लोकप्रियता वाढू लागली तसे अभिव्यक्तीच्या नावाखाली त्याने भ्रामक संकल्पनांचे तारे तोडायला सुरूवात केली. ‘एक दिन सपने में देखा सपना’ हे ठीक आहे. स्वप्नात स्वप्न दिसणं ही संकल्पना छान आहे, परंतु ‘सपने में देखी सपनी’ ह्या ओळीतला ‘सपनी’ हा शब्द म्हणजे पुढल्या ओळीतील ‘वो जो है ना लता अपनी’ या ओळीशी यमक जुळविण्याचा एक केविलवाणा प्रकार आहे. हे सगळं बघितलं की ‘सब गोलमाल है’ ही ओळ खुद्द गुलजारच्या कवितेलाच लागू पडते, हे स्पष्ट होतं. मुलांसाठी खास असं जे काही लेखन गुलजारने केलं आहे, ते देखील अचाटच आहे. ‘चड्डी पहन के फुल खिला है’, ‘टप टप टोपी टोपी’, ‘ओ पापडवाले पंगा ना ले’ वगैरे केवळ चमत्कृतीपूर्ण शब्दांचे खेळच! गुलजारचे अत्यंत रद्दड गीत म्हणजे 1999 साली आलेल्या ‘हू तू तू’ चित्रपटातील लता मंगेशकर आणि हरिहरन यांनी गायिलेले...
‘इतना लंबा कश लो यारो, दम निकल जाए
जिंदगी सुलगाओ यारो, गम निकल जाए’
धूम्रपानाचे समर्थन करणारे हे गीत गुलजारला ‘ग्रेट कवी’ मानणार्यांनी एकदा अवश्य ऐकावे (...आणि पहावे सुद्धा!) याच सिनेमातलं आणखी एक गाणं आहे, त्याबद्दल मी जास्त न बोललेलंच बरं.
‘छई चप्पा छई, छप्पाक छई
पानींयो पे छिंटे उडाती हुई लडकी...’
‘पानी’ या शब्दाचे अनेकवचन ‘पानीयों पे’ असं फक्त गुलजारंच करू शकतो. हा भाषा भ्रष्ट करण्याचा प्रकार नाही का?
कैफी आझमी आणि मजरूह सुलतानपुरी यांनी तर गुलजारच्या कवितेवर सडकून टीका केली होती. कैफी आझमींनी एका मुलाखतीत सांगितले होते, ‘‘मी गुलजारला कवी मानतच नाही. त्याने कवितेचा खेळ मांडून तिला बदनाम केलं आहे. रोमँटिक पोएट्रीच्या नावाखाली तो वाट्टेल ते खपवतो आहे. त्याला त्याच्या पात्रतेपेक्षा जरा जास्तच प्रसिद्धी मिळत आहे. गुलजार इज फेक पोएट!’’ कैफींचं हे वाक्य फार बोलकं आहे... ‘‘गुलजार इज ए फेक पोएट!’’ 1969 साली ‘खामोशी’ या चित्रपटा गुलजारने एक गीत लिहिलं...
‘हम ने देखी है उन आंखो की मटकती खूशबू
हात से छू कर इसे रिश्तो का इल्जाम ना दो’
मजरूह सुलतानपुरी यांनी या गाण्यावर आक्षेप घेतला. सुगंध हा कधी दृश्यमान असू शकतो का?
गुलजारचं आणखी एक गाणं आहे... ‘नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा’ या गाण्यात ‘नाम गुम जाएगा’ याऐवजी ‘नाम गुम हो जाएगा’ अशी ओळ अपेक्षित आहे, असं मजरूह यांचं म्हणणं होतं. त्यावर गुलजारच्या समर्थकांचं म्हणणं असं की सिनेमाचं गाणं संगीताच्या मीटरमध्ये बसवताना गीतकाराला काही तडजोड आहे. परंतु अशी तडजोड त्यापूर्वी कधी कैफी आझमी, मजरूह सुलतानपुरी, शैलेंद्र, साहिर लुधियानवी, भरत व्यास, जा निसार अख्तर यांच्यासारख्या अनुभवसिद्ध गीतकारांना करावी लागली नव्हती. काव्यरचनेचे सर्व नियम पाळूनही जे काही सांगायचंय ते अगदी प्रभावीपणे सांगता येतं, हे मजरूह सुलतानपुरींचं म्हणणं होतं. तडजोडच करायची होती तर ’नाम खो जाएगा...’ असं लिहिणं अपेक्षित होतं. तडजोड करण्याच्या नावाखाली भाषेचे आणि व्याकरणाचे लचके कशाला तोडायचे? ‘गुड्डी’ या सिनेमासाठी गुलजारने ‘हम को मन की शक्ती देना’ ही प्रार्थना लिहिली. ही प्रार्थना इतकी लोकप्रिय ठरली की ती अनेक शाळांमधून गायिली जाऊ लागली. ह्याच प्रार्थनेतील ‘दुसरों की जय से पहले खुद को जय करें’ या ओळीतील व्याकरण दोषावर अनेक भाषातज्ज्ञांनी वार केले.
वरकरणी साधेपणाचा आव आणणारा हा माणूस शब्दांचा पक्का व्यापारी आहे. साहित्यसेवा म्हणून नव्हे; तर केवळ भरमसाट पैसे उकळण्यासाठी तो गीतसदृश रचना करत असतो. प्रत्येक गीताच्या मानधनाचे आकडे काही लाखात असतात. 2001 साली राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित, अमिताभ बच्चन आणि मनोज वाजपेयी यांच्या भूमिका असणार्या चित्रपटासाठी ‘अक्स’ हे एकाक्षरी शीर्षक सुचविण्यासाठी गुलजारने लाखभर रूपये घेतले होते.
गुलजारमधल्या लेखक आणि कवीला मी कितीही नावं ठेवत असलो तरी त्याच्यातल्या दिग्दर्शकाला मात्र मी अगदी मनापासून सलाम करतो. त्याचे दिग्दर्शन कौशल्य सिद्ध करण्यासाठी फक्त दोनच उदाहरणे पुरेशी आहेत. 1958 सालच्या के. एम. नानावटी विरूद्ध महाराष्ट्र शासन या खून खटल्यावर आधारित ‘अचानक’ हा सिनेमा त्याने दिग्दर्शित केला. विनोद खन्नाची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात त्याने फ्लॅशबॅकच्या आत फ्लॅशबॅक हे जे तंत्र वापरलं आहे, ते जगातील फारंच थोड्या दिग्दर्शकांनी हाताळलं आहे. दुसरे उदाहरण देता येईल ते 1988 साली गुलजारने दूरदर्शनसाठी तयार केलेल्या ‘मिर्झा गालिब’ या मालिकेचे. त्यात नसिरूद्दीन शाहने भूमिका केली होती. बाकी गुलजारचे बरेचसे काम म्हणजे निव्वळ उचलेगिरी आणि जुगाड आहे. त्यानं जे काही उचललं ते चांगलंच उचललं, एवढीच काय ती त्याची गुणवत्ता!
गुलजारने 1971 साली पहिला सिनेमा दिग्दर्शित केला ‘मेरे अपने’. हा सिनेमा 1969 साली प्रदर्शित झालेल्या ‘अपनजन’ या तपन सिन्हा यांच्या बंगाली सिनेमावरून उचललेला आहे. ‘परिचय’ हा सिनेमादेखील राजकुमार मैत्रा यांच्या ‘रंगीन उत्तरैन’ या बंगाली कादंबरीवर आधारित असून ‘साऊंड ऑफ म्युझिक’ या इंग्रजी सिनेमाचा त्यावर प्रभाव आहे. ‘मौसम’ या सिनेमासाठी गुलजारला उत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला, परंतु त्याने या सिनेमाची जी कथा लिहिली, ती मूळ इंग्रजी लेखक ए. जे. क्रेनीन यांच्या ‘द जुडास ट्री’ या पुस्तकातील ‘वेदर’ या कथेवरून उचलेली आहे, हे त्याच्या अनेक चाहत्यांना माहिती नसावे. 1982 साली गुलजारने शेक्सपिअरच्या ‘द कॉमेडी ऑफ एरर’ या रचनेवर आधारित ‘अंगूर’ हा सिनेमा काढला.
भारतीय सिनेमासृष्टीतील अनेक दिग्गज प्रतिभावंत पुरस्काराच्या बाबतीत तसे अपेक्षितच राहिले, पण कैफी आझमी यांच्या म्हणण्याप्रमाणे गुलजारला मात्र त्याच्या प्रतिभेच्या तुलनेत जरा जास्तच पुरस्कार मिळाले. 2002 साली गुलजारला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 2004 मध्ये पद्मभूषण. याशिवाय अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 20 फिल्मफेअर पुरस्कार. 2010 मध्ये त्याला स्लमडॉग मिलेनियर या सिनेमासाठी गीतलेखनाचा ऑस्कर पुरस्कार आणि ग्रॅमी पुरस्कारही मिळाला. ग्या गाण्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे (जय हो), ते गीत जागतिक पातळीवर भारतीय साहित्याचे प्रतिनिधित्व करण्याच्या योग्यतेचे आहे का, याबाबत भारतीयांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. 2012 साली गुलजारला इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार मिळाला आणि सिनेमातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला. गुलजारच्या यशात सर्वात मोठा वाटा आहे, तो त्याच्या संगीतकारांचा. त्यातले सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे राहूल देव बर्मन. अत्यंत प्रयोगशील अशा या संगीतकाराने गुलजारच्या वेड्या-वाकड्या पद्यरचनांनाही गीत बनवले. कोणतेही मीटर नाही, यमक नाही, वृत्त नाही अशा रचनांना उत्कृष्ट चाली लावण्याचे आव्हान आरडीने अगदी लीलया पेलले आहे. अशीच एखादी रचना जर आरडीचे वडील सचिनदा यांना दिली असती तर त्यांनी गुलजारला दारातही उभे केले नसते! ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है...’ अशा वाक्यांना चाली लावणे म्हणजे दिव्यच!
गुलजार लोकप्रिय होण्याचे नेमके कारण काय असावे? आपल्याकडे असा एक स्वयंघोषित बुद्धिजीवी वर्ग आहे, जो साहित्यातले काही कळत नसतानाही केवळ जाणतेपणाचा आव आणून स्वत:चा स्टेटस सिंबॉल म्हणून गुलजारसारख्या माणसाला डोक्यावर घेतो. ह्या वर्गासाठी ‘गुलजार’ हा केवळ त्यांच्या आवडीचा ब्रँड असतो, जो त्यांना समाजात उजळ माथ्याने मिरवता येतो. याच जोरावर गुलजार थोडे-थोडके नव्हेे तर तब्बल 50 वर्षे सतत चर्चेत राहण्यात यशस्वी ठरतो. सोलापूरच्या शशिकांत लावणीस यांचा एक कार्यक्रम होता, ‘गुलजार बोलतो, त्याची कविता होते’ हे त्या कार्यक्रमाचे शीर्षक. गुलजारच्या साध्या बोलण्यातही कविता शोधणार्या या विशिष्ट वर्गाला मग पुलंच्या फुटकळ लिखाणातही साहित्यमूल्य सापडते आणि मग त्यामुळे शंकर पाटील यांच्यासारखा प्रतिभावंत साहित्यिक कायम उपेक्षितच राहतो. जो समाज केवळ किनार्यावर बसून लाटांचा आस्वाद घेत राहतो, त्या समाजात कायम गुलजारसारख्या ‘फेक पोएट्स’चा उदो-उदो होत राहणार आणि प्रतिभेची लबाडी अशीच चालू राहणार. जिथे आस्वाद घणारेच दांभिक असतील तिथे अस्सल स्वादाला किंमत कशी मिळणार?
गुलजारवर माझा व्यक्तिगत आरोप असा आहे की त्याने माझी स्वत:ची फार मोठी फसवणूक केली आहे. होय, फसवणूकच! भावनांची लबाडी आणि शब्दांची हातचलाखी करून त्याने जे विश्व माझ्यासमोर उभे केले, ते मी खरे मानून बसलो होतो, जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही.
इन रेशमी राहों में, एक राह तो वो होगी
तुम तक जा पहुंचती है, इस मोड से जाती है...
...या ओळींमधली ‘राह’ अस्तित्वात नसतानाही मी दिशाहीन वाटचाल करत होतो.
एक राह रूक गयी तो और जुड गयी
मैं मुडा तो साथ साथ राह मुड गयी...
हा भौतिकतेला न पटणारा एक धादांत खोटा सिद्धांत त्यानं माझ्या बालमनावर बिंबवला. वास्तविक जीवनात मात्र कोणतीही वाट माझ्या मर्जीप्रमाणं वळल्याचा मला अनुभव आला नाही.
हमने देखी है उन आंखो की महकती खूशबू...
असं म्हणणार्या गुलजारला अभिप्रेत असलेली ‘खुशबू’ मला मात्र कोणत्याही डोळ्यात ‘दिसली’ नाही. अशा प्रकारे गुलजार नेहमीच जे काही बोलतो ते ‘खोटं’ बोलतो आणि जगासाठी मात्र त्याची ‘कविता’ होते. गुलजार खूप मोठा माणूस आहे. त्याची आणि माझी भेट कधी घडणे शक्य नाही. तरीसुद्धा चुकून-माकून कधी तो समोर आलाच, तर सर्वात आधी मी त्याच्याकडून नुकसान भरपाई वसूल करणार आहे...
...गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या संमतीशिवाय, माझ्या मनात आपल्या फसव्या कवितेसह वास्तव्य केल्याबद्दल!
(साहित्य चपराक, डिसेंबर २०१५)
संपूर्ण अंक आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळावर वाचू शकाल।
- समीर नेर्लेकर, पुणे
९४२२५०८४७१
समीर ने नेमके वर्मावर बोट ठेवलेय....गिला गिला पानी....ऐकून मलाही यात काही तरी लबाडी आहे..खेळ आहे असे वाटत होते पण गुलजार साहेबांचे मोठे नाव..दबदबा...पाहून हिम्मत व्हायची नाही....पण समीरचा लेख वाचला आणि खात्री पटली.....अभिनंदन समीर....!
ReplyDeleteसमीर साहेब गुरु ठाकुर यांच्या बद्दल आपलं काय मत आहे ते जाणुन घ्यायला मला आवडेल
ReplyDeleteखरच सामान्य माणूस ब-याच वेळा आजाणता असतो
ReplyDeleteलेख आवडला लिंक शेअर केली तर चालेल का
एक वेगळी बाजू सविस्तर समजली.....
ReplyDelete